शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सुटकेच्या नावाखाली वेश्यांचे शोषण ! अभ्यासाचा निष्कर्ष -वेश्यांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न निरर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:17 IST

कोल्हापूर : समाजाला वेश्यामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि तथाकथित कार्यकर्ते वेश्या अड्ड्यांवर छापे घालून या व्यवसायातील तरुणींची सुटका करतात; परंतु त्यातील बहुतांशी पुन्हा या व्यवसायात येत असल्याचे एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे.

ठळक मुद्देया अभ्यासासाठी छाप्यात सापडलेल्या २४३ तरुणींचे अनुभव आणि मते जाणून घेण्यात आली७७% या छाप्यांमध्ये २१८ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यातील १६८ तरुणी पुन्हा या व्यवसायात परतल्या

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : समाजाला वेश्यामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि तथाकथित कार्यकर्ते वेश्या अड्ड्यांवर छापे घालून या व्यवसायातील तरुणींची सुटका करतात; परंतु त्यातील बहुतांशी पुन्हा या व्यवसायात येत असल्याचे एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे. प्रशासनाचा पक्षपातीपणा, वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे या व्यवसायातून सुटका होण्याऐवजी त्यांचे शोषणच होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे हा अहवाल सांगतो. 

आंतरराष्ट्रीय वेश्या हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘रेडेड’ नावाचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बचाव आणि पुनर्वसन मोहिमा केवळ पक्षपाती, हिंसक आणि समाज विध्वंसकच नव्हे, तर वेश्या आणि जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या तरुणींचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्या असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील वेश्या अन्याय मुक्ती परिषद (व्हॅम्प), संग्राम ही एनजीओ आणि नेदरलँडस्थित राईटस् फॉर चेंज यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्रातील सहेली एचआयव्ही/एड्स कार्यकर्ता संघ आणि आधार बहुउद्देशीय संस्था, कर्नाटकातील उत्तर कर्नाटक महिला ओक्कुट्टा, केरळमधील केरला नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्स आणि झारखंडमधील सृजन फौंडेशन यांनीही या अभ्यासात योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या मानवी व्यापार (प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन) विधेयक २०१८ च्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास करण्यात आला आहे. वेश्या अड्ड्यांवरील छाप्यात सापडलेल्या, सुटका करण्यात आलेल्या आणि पुनर्वसन करण्यात आलेल्या वेश्या तरुणी यांचे अनुभव जाणून घेणे  आणि ते समाजासमोर आणणेयासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा आणि धोरणांचे परिणाम याऐवजी पोलिसांचे वेश्या अड्ड्यांवर पडणारे छापे, सुटका आणि पुनर्वसन केल्या जाणाºया तरुणी यांना केंद्रस्थानी ठेवून हा अभ्यास करण्यात आला आहे. यातून निघालेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.या अभ्यासासाठी छाप्यात सापडलेल्या २४३ तरुणींचे अनुभव आणि मते जाणून घेण्यात आली. त्यातून निघालेल्या निष्कर्षानुसार..०.८२% २४३ पैकी केवळ २ तरुणी अल्पवयीन निघाल्या हे प्रमाण ०.८२ टक्के आहे.७९% २४३ पैकी १९३ तरुणींनी छाप्यावेळी आपण स्वत:हून या व्यवसायात आल्याचे सांगितले. आपली सुटका होऊ नये, असेही त्यांना वाटत होते. हे प्रमाण ७९टक्के इतके आहे.

३६% ३६ तरुणींपैकी १३ तरुणींना नुकतेच या व्यवसायासाठी आणण्यात आले होते आणि त्या या व्यवसायातच राहू इच्छित होत्या. हे प्रमाण ३६ टक्के आहे.

७७% या छाप्यांमध्ये २१८ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यातील १६८ तरुणी पुन्हा या व्यवसायात परतल्या. हे प्रमाण ७७ टक्के आहे.अहवालातील काही निष्कर्षअनैतिक व्यवहार संरक्षक कायदा (आयटीपीए) यामध्ये नावातच अनैतिक आणि व्यवहार असल्यामुळे महिलांबाबत गैरअर्थ काढला जाऊन वेश्या महिलांविषयीचा दृष्टिकोन विरोधाचा होतो.२०१० ते २०१७ या काळात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचे विश्लेषण केले असता प्रकरणे वाढल्याचे दिसते. वेश्यामुक्त समाजनिर्मितीच्या धोरणाचा एक भाग म्हणून काही लॉबिज यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असाव्यात, अशी शक्यता आहे. 

न्यायालयाचे आदेश आणि निकालांचे अर्थ लावणारी कायदेशीर यंत्रणा हे वेश्या व्यवसाय हा अनैतिक असल्याचे मानणारी आहे. महिला या कुटुंबातच सुरक्षित असतात, असे त्यांचे मत असते.कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही वेश्यांच्या विरोधात आपले वजन वापरते. पोलीसही हिंसाचार, मारहाण, दंड, खंडणी यांचा वापर करतात. यामुळे कायदेशीर पद्धतीने चुकण्याची आशा खूपच कमी राहते.

एखाद्या इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला, तर वेश्या असो नाही तर त्या इमारतीतील इतर महिला पोलीस कुणाचाच आदर ठेवत नाहीत. सर्वांनाच वेश्यालयातील महिलांप्रमाणे वागवतात.

कारवाईच्यावेळी एकूणच व्यवहार अनादराचा, शिवीगाळ, मानहानी आणि शारीरिक मारहाण ही ठरलेली असते.महिलांची मानहानी करणाºया सनसनाटी छाप्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा गैरवापर केला जातो. खासगी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे दुर्लक्षिले जाते.पोलिसांनी वेश्या अड्ड्यांवर टाकलेले छापे, केलेल्या सुटका आणि पुनर्वसन याबाबत वेश्या महिलांचे अनुभव आणि कायद्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणेचा दृष्टिकोन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा अभ्यास आहे. -मीना शेषू, सचिव, संग्राम संस्था

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार